जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन
अहमदनगर शहर दहशतमुक्त करण्याची मागणी
शहरात अचानक उद्भवलेल्या या प्रकरणात काही राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्याच्या पद्धतशीर प्रयत्न करीत असून शहरात दंगल घडवण्याचे रीतसर नियोजन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक नागेश पाठक यांना निवेदन देताना अशोक संब्बन, संजय खामकर, भैरनाथ वाकळे, संध्याताई मेढे, अर्शद शेख, विक्रम क्षीरसागर, अँड. विद्या शिंदे, फयाज शेख केबलवाला, शमस खान, सय्यद सलीम, शकील खान, सय्यद अल्फेज आदी नागरिक उपस्थित होते.