जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन

- Advertisement -

जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन

अहमदनगर शहर दहशतमुक्त करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसापासून अहमदनगर शहरात काही जातीयवादी संघटना शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करीत शहरात रस्त्यावर प्रक्षोमक घोषणा देत रॅली काढून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूपुरस्सर प्रयत्न होत आहे व धर्मोधरतेच्या माध्यमातून द्रोष आणि दहशत निर्माण करण्याचा प्रकरणातून निष्पाप व्यक्तीला मारून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

शहरात अचानक उद्भवलेल्या या प्रकरणात काही राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्याच्या पद्धतशीर प्रयत्न करीत असून शहरात दंगल घडवण्याचे रीतसर नियोजन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक नागेश पाठक यांना निवेदन देताना अशोक संब्बन, संजय खामकर, भैरनाथ वाकळे, संध्याताई मेढे, अर्शद शेख, विक्रम क्षीरसागर, अँड. विद्या शिंदे, फयाज शेख केबलवाला, शमस खान, सय्यद सलीम, शकील खान, सय्यद अल्फेज आदी नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles