अहमदनगर (प्रतिनिधी)- पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकणमधील महाड व कोल्हापूर मधील गावा-गावातील वाड्या वस्तीवर जाऊन युवान, आय लव्ह नगर व निरंजन सेवा भावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण पुनर्वसन अभियानातंर्गत हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ, स्वच्छतेचे साहित्य भेट देण्यात आली. महाड येथील भोराव, अकले, वडवली, सावंद तसेच कोल्हापूर येथील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, भैरववाडी, हेरवाड, खिद्रापूर, कुटवाड येथील जिल्हा परिषद व शहरातील नगर पालिकेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
पूरग्रस्त शाळांची अतिशय दयनीय अवस्था असताना त्या शाळेत युवानच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले. तसेच महाड येथील चवदार तळे येथे पथनाट्यातून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली. अशा कठिण परिस्थितीमध्ये तेथील ज्ञानाचा वसा चालू ठेवणार्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. अचानक आलेल्या पूरामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. शाळेच्या भिंती कोसळल्या. या भयग्रस्त वातावरणात मुलांना शैक्षणिक साहित्याच्या मदतीतून त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचे कार्य करण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमात युवानचे संस्थापक संदीप कुसळकर, सेवा दलाचे बाबा नदाफ, प्रा. विशाल खांदे, कविता चव्हाण, जगदीश शिंदे, मंगेश गुंजाळ, सोनल शिरसाठ, दशरथ देवरे, ऋषीकेश अनाप, पवन जाधव, मृन्मयी अस्वर, नामदेव कुंदनर, मारुती वाघमोडे, स्वप्निल नरके, अमोल राशीनकर, विकास फुलमाली, पारलेशा भोसले, गणेश जपकर, गणेश खंडागळे आदी युवानचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या प्रकल्पास जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व जलाराम, रोटरी प्रियदर्शिनी, कुमठेकर बॅगसचे सहयोग लाभले.