निसर्गाच्या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येकाने एक झाड लावावे : औषध निरीक्षक अशोक राठोड यांचे प्रतिपादन…
अहमदनगर प्रतिनिधी – निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन औषध निरीक्षक अशोक राठोड यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अपंग संजीवनी सोसायटीचे मुक बधिर विद्यालय, सावेडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, मोहटादेवी मंदिर ट्रस्ट चे संचालक सुधीर लांडगे, अमित धाडगे, विद्यालयाचे चेअरमन मधुकर भावले, मुख्याध्यापिका विद्या भावले, दिलीप जगधने, भाऊसाहेब घोंडगे, अझर शेख, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार, विशाल जगताप आदी उपस्थित होते.
निरीक्षक राठोड म्हणाले स्नेहबंध फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत नगर शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. नगर शहरात हिरवळ करण्यास स्नेहबंध फाऊंडेशनचे काम मोलाचे आहे.
स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली आहे. वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी सहभागी व्हावे.