अवजड वाहतूक सुरूच; आमदारांचा वाहतूक शाखेत ठिय्या; पीआय भोसलेवर कारवाईची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला वाहतूक शाखेकडून केराची टोपली

अहमदनगर प्रतिनिधी – शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला.

वाहतूक शाखेच्या गलथान कारभाराविरोधात आमदार जगताप यांनी कार्यालयातच आंदोलन सुरू करून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आजच्या आज अवजड वाहतूक बंद करा, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी पोलीस निरीक्षक भोसले यांना आमदार जगताप यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर नगर शहरामध्ये अनाधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृतपणे वाहने उभी केली जातात.यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शहराचे विद्रूपीकरण होते. यावरती ठोस कारवाई न केल्यास येत्या पंधरा दिवसात नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.लेखी आश्‍वासनानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थित झालेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीमध्ये झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी आदेशही बजावले होते.

आज दोन महिना होऊन गेला तरीही त्याची अंमलबजावणी व्हायला तयार नाही. सर्रासपणे अवजड वाहतूक शहरामधून जात आहे. अवजड वाहतुकीमुळे मागील महिन्यामध्ये दोन जणांचा बळी सुद्धा गेला आहे. तरीही पोलिस प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आजच्या आज अवजड वाहतूक बंद करा, अशी मागणी करत शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ आदेश काढतात, त्याची अंमलबजावणी होत नाही, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो, आज दोन जणांचे बळी सुद्धा गेलेले आहेत, तरी वाहतूक शाखा झोपलेली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

याला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले हेच जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यापुढील काळात कुठलीही दुर्घटना झाली, तर याला वाहतूक शाखा जबाबदार राहील, असेही त्यांनी सांगितले. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या तसेच, इतर अवजड वाहने शहरातून जातात यामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा होते.पाण्याच्या पाइपलाईन रस्त्याखाली आहे. जर त्या फुटल्या तर कोण जबाबदार? जर वरिष्ठांचा आदेश असताना देखील सुद्धा त्याची पायमल्ली शहर वाहतूक शाखा करणार असेल, तर काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मि रात्री बारानंतर वाहतूक शाखेचे भोसले यांच्याशी बोलतो, त्यांना ते सांगतो, तरीही आज दोन महिने उलटून गेले तरीही आदेशाकडे काणाडोळा होतो. वाहतूक शाखेचे निरीक्षक भोसले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार जगताप यांनी यावेळी केली. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी प्रा.माणिकराव विधाते,नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे,प्रा.अरविंद शिंदे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, संभाजी पवार,अभिजित खोसे,संतोष ढाकणे,विजय सुंबे,आरिफ शेख,अमित खामकर, साहेबांन जहागीरदार,भरत गारुडकर, पप्पू पाटील,अजिंक्य भिंगारदिवे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!