अहमदनगर जिल्ह्यात सहकार विद्यापीठ स्थापन होण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री ना.शरद पवार यांना निवेदन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

तसेच भिंगार कॅन्टोंमेंटला सर्विस चार्ज (फंड) निधी व चटई क्षेत्राचे एफएसआय वन प्लस थ्री मिळण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी

 

अहमदनगर प्रतिनिधी – सहकार क्षेत्राचे सर्वात मोठे जाळे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सहकार विद्यापीठ स्थापन होण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.शरद पवार यांना केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी शहरात आलेले ना.पवार यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.

अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा असून, या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राचे मोठे जाळे आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रात पहिला सहकारी कारखाना अहमदनगर जिल्हा पासून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथून सुरु झाला होता.

जिल्ह्याला सहकाराचा मोठा वारसा आहे. तसेच जिल्ह्यात सहकारी बँका, पथसंस्था कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहकार विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तसेच रक्षा मंत्रालय कडून भिंगार कॅन्टोंमेंटला सर्विस चार्ज (फंड) निधी थकीत असून, यामुळे कामगारांचे वेतन काही महिन्यापासून थकित आहेत.असे पहिल्यांदाच झाले असून, निधी नसल्यामुळे भिंगारचे प्रश्‍न सुटलेले नाही. भिंगार शहराची लोकसंख्या वाढत असताना क्षेत्र मर्यादित आहे.

चटईक्षेत्राच्या नियमामुळे नागरिकांना दुमजली घरे बांधता येत नाही.परिणामे अनेक नागरिक घरापासून वंचित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भिंगार चटई क्षेत्राचे एफएसआय वन प्लस थ्री होण्यासाठी केंद्र सरकार व रक्षा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सपकाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!