आदर्श गाव हिवरे बाजारच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या सायकल रॅलीचे शहरात स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने
महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त अभिवादन

महापुरुषांचे विचार व तत्वज्ञान अंगीकारल्यास जीवनाचा यशस्वी मार्ग सापडतो – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजारच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले.

 आमदार जगताप व राज्य आदर्शगाव समितीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते थोर समाज सेविका हिराबाई भापकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सायकल रॅलीचे स्वागत झाले.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक मोहन कदम, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर धर्माधिकारी, विठ्ठलराव भोयरे, श्रीकांत मांडे, गणेश बोरुडे, जॉय लोखंडे, मारुती पवार, भरत पवार, भाऊ मुदगल, संतोष लांडे, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महापुरुषांचे विचार व तत्वज्ञान अंगीकारल्यास जीवनाचा यशस्वी मार्ग सापडतो.महात्मा गांधींनी अहिंसेने ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून लावली. जेंव्हा सर्वसामान्यांवर अन्याय होत असतो तेंव्हा क्रांती घडत असते. महात्मा गांधीजी यांनी अन्यायाविरुध्द लढण्यासाठी सर्वसामान्यांना सत्याग्रहासारखे शस्त्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा.माणिक विधाते यांनी महात्मा गांधीजी यांनी संपुर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी दिले.त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेला संघर्ष आजच्या युवकांना प्रेरणा देणारा असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!