आष्टी प्रतिनिधी – बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवानी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे जात असतांना आष्टी तालुक्यातील धामणगाव जवळ असलेल्या म्हसोबाची वाडी घाटात क्रेटा गाडी घाटाच्या खाली कोसळली.
हा अपघात घाटाचा अंदाज न आल्याने झाल्याचे समजते.या गाडीमध्ये असलेल्या पाच जनांपैकी चार जणांचा मृत्यू झालाय व एक जण गंभीर जखमी असून त्याला अहमदनगर येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या अपघातात टेकवानी कुटुंबातील सुनील टेकवानी,शंकर टेकवानी,सतीश टेकवानी आणि लखन टेकवानी असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत .
बीड मधील टेकवानी कुटूंब हे प्रसिद्ध व्यापारी आहेत.या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.