आमदार संग्राम जगताप यांनी केली हेल्पलाइन सुरू
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये अनेक कुटुंबातील नागरिक दुर्दैवी मृत्युमुखी पडले आहे.काहींचा आधारस्तंभ गेल्याने त्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यांना राज्य सरकारने खारीचा वाटा म्हणून ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

तरी दुर्दैवी मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे,परंतु ही प्रक्रिया करत असताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालय मध्ये ऑनलाइन हेल्पलाइन सुविधा सुरु केली आहे.
ज्या कोणाचा कोविड मध्ये मृत्यू झाला आहे.अशा वारसांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे असलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये संपर्क साधावा असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.
याठिकाणी हेल्पलाइन सुविधा सुरु केली आहे.त्या व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवण्यासाठी मदत केली जाणारी ऑनलाईन प्रक्रिया या ठिकाणी भरून घेतली जाणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.