अहमदनगर प्रतिनिधी – कोविडचा काळ हा सर्वानसाठी कठीण काळ होता. कोरोना संसर्ग विषाणू हा नवीन आजार असल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे कठीण जात असतानाही आम्ही कोविड रुग्णांना आधार,धीर व योग्य उपचार केल्यामुळ हजारो रुग्ण साई एशियन हॉस्पिटल मधून बरे होऊन आनंदाने घरी गेले आहेत,कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे अनेक कुटुंबीयांना आपले आधार गमवावे लागले आहे. या घटना दुःखदायक व मन हे लावणाऱ्या घटना घडल्या, कोवीडच्या रुग्णांना वेळेवर योग्य निदान व योग्य डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यास रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते.ऑक्सीजन विना रुग्ण बरे होतात कोविड बरा झाल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निदान करून काळजी घ्यावी.कोरोना रुग्ण वंदना दारकुडे यांचा 20 स्कोर होता पेशंटची परिस्थिती कठीण आतांना आम्ही योग्य पद्धतीने उपचार केले पेशंटने या उपचारास साथ दिल्यानंतर नऊ दिवसात रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले. कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तातडीने चाचण्या करून वेळेत उपचार घ्यावे,कोरोना आजार हा बरा होणार आजार आहे तरी रुग्णांनी घाबरून जाऊ नये असे प्रतिपादन साई एशियन हॉस्पिटलचे डॉ.सचिन पांडुळे यांनी केले.
कोरोना रुग्ण वंदना दारकुंडे हिच्या वर साई एशियन हॉस्पिटलच्या वतीने कठीण परिस्थितीत योग्य उपचार करून बरे केल्याबद्दल दारकुंडे कुटुंबियांच्या वतीने डॉ. सचिन पांडूळे, डॉ.नितीन नागरगोजे,डॉ.जगदीश पाटील यांचा विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब निमसे,विठ्ठल दारकुंडे,संजय निमसे, जनसंपर्क अधिकारी संपत पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पंडित आदी उपस्थित होते.
वंदना दारकुंडे म्हणाल्या की, कोरोनाच्या आजाराने मी ग्रासले होते साई एशियन हॉस्पिटलने माझ्यावर योग्य उपचार करून मला नऊ दिवसांत बरे केले देवदुता सारखे सर्व डॉक्टर धावून आले व मला जीवदान दिले.