कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
शासनाच्या विविध योजना साठी अधिकृत कार्यालयाकडे अर्ज करून शासनाचे दिलेले शुल्क अर्जदारांनी भरावे, वाढीव शुल्क मागणी कोणी मागणी करत असेल तर याबाबत तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.
प्रसिद्धी दिलेल्या पत्रकामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत वृध्द,विधवा, अपंग,निराधार,परित्याक्त्या, अनाथ व दुर्धरआजारणे ग्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणेकमी सध्या परिस्थितीत तहसीलदार यांचे अध्य्यक्षतेखाली वेळोवेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक घेतली जाते व सदर बैठकीत प्राप्त अर्जाची छाननी करून कागदपत्रांची तपासणी करून शासन निर्णयातील तरतुदीनुसार नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाते.
परंतू मागील काही दिवसांमध्ये असे निदर्शनास आले आहे कि,काही त्रयस्त व्यक्ती/एजंट यांचेकडून लाभार्थी यांना प्रकरण मंजुरीचे आमिष दाखवून पैशाची लुट करतात. विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभार्थींना शासनामार्फत आर्थिक लाभ दिला जातो, यासाठी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक अर्ज फी रु.३३.६०/- इतकी असून विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे जोडून संबंधित लाभार्थी यांनी अर्ज आपले सरकार केंद्राकडे जमा करावा.
जर आपले सरकार सेवा केंद्र चालक शासकीय फी व्यतिरिक्त अवास्तव रक्कम आकारात असतील तर त्यांचे बाबत रीतसर तक्रार या कार्यालयाकडेस करावी.लाभ चालू असणा-या लाभार्थ्यांनी किंवा ज्यांना लाभ सुरु करावयाचा आहे अशा लाभार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव त्रयस्त व्यक्तींनी दिलेल्या अमिषाला बळी पडू नये.
उलट आपल्या समस्यांबाबत तसेच कागदपत्रांबाबत स्वत: या कार्यालयात येऊन माहिती प्राप्त करून घ्यावी.
जर कोणी त्रयस्त व्यक्ती आर्थिक लुट करणेचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींबाबत या कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करावी जेणेकरून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले आहे.