जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे आमदार संग्राम जगताप व व्यापाऱ्यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी –

गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोणाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा वापर करुन. कोरोणा संसर्ग विषाणू रोखण्यासाठी मदत झाली. परंतु व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरी मुंबई-पुणे येथे काल पासून सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केले आहे.त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ खुल्या कराव्यात. जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक कारणासाठी ७ ते ४ ही वेळे दिले आहे तरी आता ११ ते ६ वेळेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून व्यवसायीकरणाला चालना मिळेल . शहरातील उद्योजकांकडे हजारो कामगारचे कुटुंब अवलंबून आहे. त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे आमदार संग्राम जगताप व व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा व शनिवार रविवार सुद्धा दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी केली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना आमदार संग्राम जगताप व शहरातील व्यापारी संघटनांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी व्यापारी सुभाष कायगावकर. माजी नगरसेवक संजय चोपडा. संतोष बोरा. सचिन मुथा. उमेश बोरा. प्रेमराज पोखरणा. रवी गुजराती. राजेंद्र बोथरा. नाना बोजा आदी उपस्थित होते
यावेळी वेळी व्यापारी संतोष बोरा म्हणाले की कोरोनाच्या महासंकट काळामळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. नगर शहरातील बाजारपेठावर हजारो कुटुंबंचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. वारंवार लाॅकडॉन मुळे बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील ग्राहक या बंदमुळे इतर जिल्ह्यांमध्ये खरेदीसाठी जाऊ लागला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय साठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!