अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंंबर रोजी आग लागून त्या घटनेत आत्तापर्यत १२ जणांचा मृत्यू झाला.अतिदक्षता विभागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना दोषी धरून त्यांना गुन्ह्यात वर्ग करून घेतले.
यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी या घटनेचा निषेध व्यक्त करून झालेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत गेली ९ ते १० दिवसापासून काम बंद आंदोलन केले आहे.
जिल्हा रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात याव्यात, जोपर्यंत आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येत नाही तोपर्यंत होणार्या दुर्घटनेस डॉक्टर,परिचारिका, कर्मचार्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये.
मुळात आग विजवणे हे आपत्कालीन व्यवस्थेचे काम असून याचे प्रशिक्षण परिचारिका डॉक्टर यांना नसते.त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी,तसेच आग लागण्यामागील तांत्रिक कारण असून त्यास वेगळ्या विभागाचे लोक जबाबदार आहेत.
परिचरिकांचे काम हे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसार औषधोपचार देणे, रुग्णानांची सुषुश्रा करणे, काळजी घेणे हे आहे,यात जर काही कर्तव्य कसुरता असती तर झालेली कारवाई योग्य मानली असती.असे यावेळी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे म्हणाल्या.
मागील १० दिवसपासून जो हा आंदोलनाचा लढा सुरू ठेऊन काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची खास वेळ घेऊन शिष्ट मंडळ डॉक्टर गनबोटे,डॉ साईगावकर,डॉ खेडकर जिल्हा परिषद संघटना,राज्य सचीव पाटील मॅडम,सतीश शिंदे,राज्य पदाधिकारी नितेश जाधव,IMA चे सचिव,अध्यक्ष आणि महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना अध्यक्ष सुरेखा आंधळे आदींनी आपल्या मागण्या व म्हणणे यावेळी मांडले.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की आपल्या मागण्या,म्हणणे यावर शासन विचार करील,कुणावरही अन्याय करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
परिचारिका संघटना या निर्दोष परिचारिका यांच्या पाठीशी असून न्यायालयावर आमचा विश्वास आहे.आमच्या परिचरिकरांना न्याय मिळेल आणि खरे दोषी जेल मध्ये लवकर जातील.असा विश्वास परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी व्यक्त केला आहे.