नेप्तीला शेतकरी मेळावा व निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

फळबाग व अन्नधान्य उत्पादक शेतकर्‍यांनी गटशेती करावी – पोपटराव नवले

अहमदनगर प्रतिनिधी – समीर मन्यार.

गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना भविष्यात चांगले दिवस आहेत. गटशेती ही काळाची गरज आहे. राज्यात 1990 पासून कृषी विभाग फलोत्पादन योजना राबवत असून, त्याचा चांगला फायदा शेतकर्‍यांना झालेला दिसतो. वैज्ञानिक युगात काळानुरूप बदल झालेले आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनीही बदलायला हवे. गटशेतीला उज्ज्वलल भविष्य असून, फळबाग, ज्वारी, बाजरी करणार्‍या शेतकर्‍यांनी गटशेती करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी केले.

नेप्ती येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (सन 2021-22) अंतर्गत शेतकरी मेळावा व निविष्ठा वितरण कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद नगर जिल्हाध्यक्ष व हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे व तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या हस्ते ज्वारी बियाण्यांचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. यावेळी श्री. नवले बोलत होते.

नेप्तीचे उपसरपंच सुभाष जपकर, बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, संजय जपकर, मंडळ कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, शंकर खाडे, संभाजी गडाख, नितीन कदम, सौरभ जपकर, रामदास फुले, बी. आर. कर्डिले, शुभांगी काकडे, संतोष चौरे, अजय कर्डिले, जमीरभाई सय्यद, शुभम जपकर, बादशाह सय्यद, बाबूलाल सय्यद, लक्ष्मण कर्डिले, सागर कर्पे आदी उपस्थित होते.

श्री. नवले पुढे म्हणाले की, कृषी विभाग, शेतकरी व शेतकरी गटांनी एकत्र मिळून काम केले, तर शेतकर्‍याला निश्‍चितच मोठा फायदा होईल. कृषी विभागातील प्रत्येक घटक हा शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे. तळागाळाततील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. विभागाच्या माध्यमातून प्रोसेसिंग युनिट अनुदान तत्त्वावर दिले जाते. त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा. आत्माच्या माध्यमातून डेअरी उत्पादनासाठी 30 लाखापर्यंत अनुदान तत्त्वावर योजना असून, 30 प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून सादर केले आहेत. नगर तालुका अकोळनेर मंडळात 17 ज्वारी प्रकल्प असून, एक प्रकल्प 10 हेक्टरचा आहे. एक प्रकल्पात 25 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली असून, एक प्रकल्पासाठी 100 किलो रेवती ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. नेप्ती येथे दोन प्रकल्प देण्यात आले असून, त्याअंतर्गत शेकर्‍यांना ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. याप्रमाणे केडगाव, जखणगाव, निमगाव घाणा, टाकळी खातगाव, हिंगणगाव, निमगाव वाघा येथे प्रत्येकी 1, हिवरेबाजार 2 प्रकल्प देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद नगर जिल्हाध्यक्ष व हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे म्हणाले की, कृषी विभागाच्या माध्यमातून चांगल्या योजना राबवल्या जात असून, शेतकरी मेळावा कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत कृषी विभागाचा कर्मचारी पोहोचला असून, त्याचा शेतकर्‍यांना लाभ होत आहे, असे सांगितले.

मंडळ कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात कृषी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, बी. आर. कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी यांत्रिकीकरणाातून सविता जपकर, लहानू जपकर यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक शंकर खाडे यांनी केले, तर संजय जपकर यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!