पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक रस्त्याचे नामांतर कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग करण्याचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम थांबविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-

शहरात धर्माधिकारी मळा येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन टाळेबंदीत बंद पाडलेले फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम पुन्हा महापालिकेच्या परवानगीने सुरु झाल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोककर्क विरोधी सत्याग्रह जारी करण्यात आले आहे. तर गुरुवार दि.12 ऑगस्ट रोजी पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक रस्त्याचे नामांतर कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

एप्रिलमध्ये टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शवून रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्याने महापालिका प्रशासनाने सदर काम तात्पुरत्या स्वरुपात बंद पाडले. मात्र संबंधित जागा मालकाने महापालिकेकडून परवानगी घेऊन पुन्हा टॉवर उभारणीचे काम सुरु केले आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध आहे.

मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे मिळणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता टॉवर उभारले जात आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. तरी महापालिका प्रशासनाचे अधिकारी आर्थिक हितासाठी लोकवस्तीमध्ये अशा टॉवरला परवानगी देत  असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेने लोकवस्ती मध्ये उभे राहत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरची दिलेली परवानगी रद्द करुन सदर काम थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाचा अंधाधुंदी कारभार सुरु असून, पैसे घेऊन सर्व नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार सुरु आहे. जागा मालक टॉवर उभारुन पैश्याचा झाड लावत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरला बळी पडावे लागणार आहे. दाट लोकवस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास महापालिका प्रशासन कोणत्या नियमाने परवानगी देत आहे? तातडीने टॉवरचे काम थाबवावे. अन्यथा सर्वसामान्य नागरिक आक्रमकपणे आंदोलन उभारणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी माधवी दांगट, प्रकाश हजारे, डॉ. अनिल बोरा, अभय मेहेत्रे, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, गोरक्षनाथ दांगट आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!