भगूर येथील सरपंच व भगुर ग्रामस्थ यांच्याकडून मा.ना. प्राजक्त तनपुरे यांना मदतीचे निवेदन

- Advertisement -

शेवगाव प्रतिनिधी-

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दि . ०२ सप्टें रोजी मा ना प्राजक्त तनपुरे यांचा भगूर, कोरडगाव ,आखेगाव, तिसगाव याठिकाणी पूरग्रस्त भागात दौरा झाला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त ,नुकसानग्रस्त शेतीची ,पुलाची ,घरांची ,गावाची पाहणी केली व लोकांशी चर्चा केली.भगूर मध्ये आले असता ग्रामस्थाकडून काही मागण्या झाल्या .

दि ३० ऑगस्ट  रोजीच्या मध्यरात्री व दि ३१ ऑगस्ट  रोजीच्या सकाळी भगुर गावामध्ये अतिवृष्टी होऊन निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी असे निवेदन मा ना प्राजक्त तनपुरे आपत्ती व्यवस्थापन ,मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सरपंच व भगुर ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आले .
सविस्तर माहिती अशी कि ,भगूर गावामध्ये पुरामुळे ज्यांचे घरे पडली आहेत त्यांना विशेष बाब म्हणून प्राधान्याने त्वरित घरकुल देण्यात यावे.तसेच शेताकडे जाणारे पूल फुटल्यामुळे,खचल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाता येत नाही.त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे त्वरित पूल मंजूर करावेत.तसेच पावसामुळे भगुर-आव्हाने व भगूर-वडुले या रोडची अतिशय दुरवस्था झाली आहे.तरी विशेष बाब म्हणून हे दोन रोड प्राधान्याने मंजूर करून पूल करण्यात यावेत.ज्यांच्या घरात पावसामुळे किराणा, धान्य नुकसान झाले आहे त्यांना ३ महिने पुरेल असा किराणा व धान्य पुरविण्यात यावा.शेतीचे तातडीने पंचनामे करुन प्रति हेक्टरी योग्य भाव देण्यात यावा.जनावरे मृत्युमुखी व वाहून गेले आहेत त्यां शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी.ज्यांचे घराची पडझड झाली आहे त्यांना त्वरित शासकीय अनुदान ५०००० देण्यात यावे.जि प प्राथमिक शाळा कंपाऊंड भिंत पडली आहे आणि वर्ग खोली खचले आहेत ते दुरुस्ती अति तात्काळ मिळावी.हरिजन वस्ती कंपाउंड सर्व पडले असून ते नव्याने द्यावे,गावातील  सिमेंट रस्ते ,पेविंग ब्लॉक रस्ते ,बंदिस्त गटार सर्व नुकसान झाले असून ते भरपाई  मदत मिळावी.साबळे वस्ती वरील बंधारा फुटून शेजारील शेती वाहून गेली आहे तरी बंधारा दुरुस्ती त्वरित व्हावी आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी.

अशा ११ ते १२ मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत.यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे , राजश्रीताई घुले ,संजय कोळगे,क्षितिज घुले,भगूरचे सरपंच वैभव पूरनाळे ,नागेश पूरनाळे,साबळे भोलेश्वर ,मुरदारे दिनेश व भगूर ग्रामस्थ उपस्थित होते .

अवकाळी पुरामुळे भगूर गावाचे खूप भरून न निघणारे नुकसान या दोन दिवसात झाले आहे.यामध्ये घरांची पडझड,जनावरे मुर्त्यूमुखी पडले,होत्याच नव्हतं झालं . मी गावाचा प्रथम नागरिक असल्यामुळे गावाला या संकटातून बाहेर काढणे माझी जबाबदारी आहे.या गावाचे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत नुकसानग्रस्तांना मिळावी या करिता मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब,मा.ना.प्राजक्त तनपुरे,मा.तहसीलदार अर्चना पागिरे याच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles