शेवगाव प्रतिनिधी – आज राज्यभरात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले.गेल्या 2 वर्षांपासून या जगावरच कोरोना या महामारीचे संकट ओढवलेले आहे.यामुळे श्री गणेशाचे विसर्जन मिरवणूकेला राज्य सरकारने बंदी घातलेली आहे.शेवगाव तालुक्यामध्ये देखील गणेशाचे विसर्जन,पाण्याच्या हौदामध्ये,विहीरीत, नदीमध्ये झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शेवगाव शहरातील नागरिकांनी भगूर तसेच जोहरापूर नदीच्या पुलावरून श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केलेली होती.शहरातील नागरिक हे चारचाकी वाहनातून श्री गणेशाची मूर्ती तसेच लहान बालगोपाल आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरिता याठिकाणी आले होते.यावेळी नक्कीच बालगोपालानी देवाकडे नक्कीच मागणी केली असेल की करोना जाऊ दे आणि आमच्या शाळा पुन्हा सुरू होऊ दे .
याठिकाणी काही दुर्घटना होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन यांच्याकडून देखील या दोनही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.तसेच गावोगावी मिरवणूक काढू नये याकरिता शेवगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी गावोगावी या आदेशाचे पालन व्हावे याकरीता गस्त घालताना दिसत होते.