महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही;जिल्हाधिकारी आणि तहसील मार्फत राज्य सरकारला निवेदन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – दिपक कासवा

ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई आग्रही आहे.या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरपंच परिषदेच्या वतीने आग्रही मागणी करण्यात येत असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

या पार्श्‍वभूमीवर नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार (दि.11 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित व नायब तहसीलदार अभिजित बारस्कर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सरपंच परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, नगर तालुका महिला अध्यक्ष अनुजा ताई काटे,नगर तालुका सचिव नानासाहेब डोंगरे,सारोळा कासार उपसरपंच जयप्रकाश पाटील,मांजरसुंबा सरपंच जालिंदर कदम,चिचोंडी पाटील सरपंच मनोज कोकाटे,भोयरे पठार सरपंच बाबासाहेब टकले,देवगाव सरपंच कविता वामन,बुरुडगाव सरपंच बापूसाहेब कुलट,धनगरवाडी सरपंच किशोर शिकारे,बुरुडगाव उपसरपंच महेश निमसे,खातगाव टाकळी सरपंच मिठूशेठ कुलट,विष्णू आढाव, बाळासाहेब आढाव,हमीदपूर सरपंच छबुराव कांडेकर आदी सरपंच उपसरपंच,सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सत्ता काळात जनतेमधून सरपंच निवडीचा घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.सध्या महाराष्ट्रात नवीन सरकार आले असून, या सरकारकडून सरपंच थेट जनतेतून निवडावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी सरपंच परिषदेने पुढाकार घेतला असून,जनतेमधून सरपंच निवडला गेल्यास घोडे बाजार थांबून खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाला न्याय मिळणार असल्याची भूमिका सरपंच परिषदेने घेतली असल्याचे आबासाहेब सोनवणे यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!