मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनाना प्रवेश बंदी

- Advertisement -

मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनाना प्रवेश बंदी

अहिल्यानगर – मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनाना प्रवेश बंदी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक यांनी काढले आहेत. वाहनावर कडक कारवाई केली जाणार आहे. असे आदेश वहातूक शाखेला देण्यात आले आहे.
दि. १४/०४/२०२४ चे १४.०० वा. पासून रात्री २४.०० वा. पर्यंत ईम्परिअल चौक-माळीवाड़ा-पंचपीर चावडी-तख्ती दरवाजा-माणिक चौक क-कापडबाजार- तेलीखुट-चितळेरोड चौपाटी कारंजा-दिल्लीगेट जाणारे मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा होत असल्याने अहमदनगर शहरात विविध मंडळाचे वतीने १५.०० ते २४.०० वा. चे दरम्यान मिरवणुकांचे आयोजन केलेले आहे, सदर मिरवणुकीत एकुण १५ ते १६ मंडळे सहभागी होणार असल्याने मिरवणुका मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने मिरवणुका मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. मिरवणुकांवेळी अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने मिरवणुक दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता मिरवणुक मार्ग वाहन विरहीत क्षेत्र (नो व्हीकल झोन) म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.
राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगरयांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात २४.०० वा. पर्यंत इंम्पेरिअल चौक-माळीवाडा-पंचपीर प्रमाणे दि. १४/०४/२०२४ रोजीचे दुपारी १५.०० ते तख्ती दरवाजा-माणिक चौक-कापडबाजार- तेलीखुंट- चितळेरोड-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट या रोडवरील येणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद केलेबाबत आदेश पारीत केले आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!