राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  अभिवादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  अभिवादन

साहित्यातून देशाला दिशा देणारे विचार समाजासमोर मांडले – सचिन जगताप 

नगर : महान देशभक्त, प्रखर हिंदुत्वाचे भाष्यकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्हीतून आपले संपूर्ण जीवन देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्य यांसाठी झोकून दिले. साहित्यातून देशाला दिशा देणारे विचार वेळोवेळी समाजासमोर मांडले. त्यांचे देश प्रेम आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन  मा. जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मा. जिल्हा परिषद सदस्य ॲड सचिन जगताप यांनी चौपाटी कारंजा येथील पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, प्रा अरविंद शिंदे, मयूर जोशी, युवराज शिंदे, दीपक खेडकर,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी व इतर सावरकरप्रेमी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आधुनिक विचारधारा प्रमाणे कार्य करत होते त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. देशाच्या जडणघडणीत्त सावरकर यांचे मोठे योगदान आहे असे त्यांनी सांगितले

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!