राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व नामदार जितेंद्र आव्हाड मंच प्रदेश च्या वतीने अहमदनगर एमआयडीसी मधील कंपन्यातील केमिकल युक्त घनकचरा तसेच वेस्टेज कचरा निंबळक बायपास रोडवरील मोकळ्या जागेमध्ये विना परवानाधारक परप्रांतीय  नागरिकांनी स्क्रॅप चे दुकान मोठ्या प्रमाणात उभारली आहेत. या घनकचऱ्याची योग्य ती विल्हेवाट न लावता कचरा हा पेटून दिले जाते व कचरा हा संपूर्ण रस्त्याच्या कडेला साचत आहे त्यामुळे येण्या-जाण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे व या केमिकल युक्त घनकचऱ्याची राख व केमिकल यामुळे निंबळक गावातील वातावरण प्रदूषित झालेले आहे. तसेच घनकचऱ्याची राख पावसाळ्यामध्ये निंबळक मधील पाझर तलावांमध्ये हे विषारी द्रव्य जातात. या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आणि मच्छ व्यवसाय करणारे आदिवासी समाज यांच्या आरोग्य आणि जीवितास धोका निर्माण झाला आहे. याची योग्य ती कारवाई न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण चालू करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग बाळासाहेब ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, जितेंद्र आव्हाड मंच जिल्हाध्यक्ष नगर तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अमोल शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग नगर तालुका युवक अध्यक्ष श्रीकांत शिंदे, तालुका सरचिटणीस सिताराम सकट, अरविंद बेरड, छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, शहराध्यक्षा मेहमुदा पठाण, गणेश गायकवाड, गोरख आढाव,तालुका अध्यक्ष छावा किरण फटांगरे, भगवनाथ झिने, गणेश शिंदे, भिंगार शहराध्यक्ष, सलमान सय्यद आदी  उपस्थित होते. या उपोषणास छावा संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!