शेवगाव प्रतिनिधी-
नवोदित कवींनी समकालीन परिस्थितीचे मूल्यमापन आपल्या कवितेतून केले पाहिजे असे मत कवी गणेश पोटफोडे यांनी व्यक्त केले.
रोटरी कम्युनिटी कॉर्प्स अमरापूर आयोजित नवोदितांच्या ऑनलाइन कवी संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून थेट दुबई वरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी नवोदित कवींना मार्गदर्शन केले.
या नवोदितांच्या काव्य संमेलनामध्ये प्रा.पूनम खरड,बाळासाहेब कोठुळे, अमोल सुसे,ज्ञानेश्वर बढे,प्रा.सचिन सुसे,दिपेश पिटेकर,आदिनाथ शिदोरे,राजेंद्र काळे,माधुरी खैरे,आत्माराम शेवाळे आदी.कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा.पूनम खरड यांनी स्वागत गीत म्हणून केली.रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे सचिव प्रा.किसनराव माने यांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमासाठी पत्रकार राजू घुगरे, प्रदीप बोरुडे,संतोष सातपुते,संजय तरटे, संदीप पोटफोडे,जवखेडचे माजी सरपंच सचिन नेहुल,प्रा.दिलीप चौधर,मधुकर घुले,योगेश खैरे,मीनाताई कळकुंबे चंद्रकांत देवढे,पत्रकार निकेत फलके,धनंजय फलके,सतीश सुपारे,रवींद्र फलके,हरिश्चंद्र नजन, संदीप दुधाळ,भाऊसाहेब पाचारणे,योगेश शिकारे,दीपक भापकर,अशोक कळमकर,अनिरुद्ध महाजन आदी.प्रामुख्याने ऑनलाइन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या तांत्रिक बाजू प्रा.चंद्रकांत पानसरे यांनी हाताळल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक थोरात आणि महेश लाडणे यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी व्यक्त केले.