अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
कालच्या पावसाने अहमदनगर शहरांमध्ये लाखो रुपये खर्चून पॅचिंग करण्याचा केलेला बनाव अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये उघडा पडला आणि खड्ड्यात वर वर भरलेली फक्त खडी आणि मुरूम क्षणात वाहून गेले व शहराची परिस्थिती परत जैसे थे झाली,खड्ड्यात पॅचिंग करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून दिखाऊ बोगसगिरी केल्यामुळे लाखो रुपये कालच्या एक तासाच्या पावसात शब्दशः पाण्यात गेले.
या सर्वाचा निषेध म्हणून जागरूक नागरिक मंचतर्फे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली गाडगीळ पटांगणा समोर प्रचंड खड्डे असलेल्या रस्त्यावरील डबक्यांमध्ये रंगीत कागदी होड्या सोडून प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले.
विकासाचे टायटॅनिक नगरी खड्ड्यात.असा फलक लावलेल्या अनेक कागदी रंगीत होड्या रस्त्यावरील डबक्यात सोडण्यात आल्या.
या प्रतिकात्मक आंदोलनातून संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी धडा घेतला नाही तर पुढचे आंदोलन त्यांच्या दालनात आणि घरासमोरही उग्र स्वरूपात केले जाईल.असा इशारा देण्यात आला.सदर आंदोलनाला जागरूक नागरिक मंचाचे जागरूक सदस्य मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष उपस्थित होते.
मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी प्रास्ताविक केले,उपाध्यक्ष सुनील पंडित सर,सचिव कैलास दळवी,सुनील कुलकर्णी,अभय गुंदेचा,बी.यु कुलकर्णी, अमृत शेठ बोरा,योगेश गंणगले,डि.एम कुलकर्णी, पुरूषोत्तम बेंद्रे,अभय गुंदेचा,बाळासाहेब भुजबळ,जय शेठ मुनोत,मकरंद घोडके,शारदा ताई होशिंग,सुरेखाताई सांगळे, मयूरी भागवत,आशाताई गायकवाड,छाया चंगेडिया, गौरी भागवत,इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.