शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी आक्रमक.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन – अभिजित खोसे

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरातून जाणाऱ्या एन.एच-222 राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी शहर राष्ट्रवादी आक्रमक झाली असुन. नगर शहरातील सक्कर चौक ते काटवन खंडोबा चौक ते अमरधाम मार्गे नेप्ती नाका ते कल्याण रोड उड्डाणपूल पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून नागरिकांना वाहने चालवताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्यावर झालेल्या छोट्या- मोठ्या खड्ड्यांमुळे याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरच मंगल कार्यालय, हॉस्पिटल, महाविद्यालय, भाजी मंडई, अमरधाम तसे छोटे मोठे उपनगर सदरच्या रस्त्यालगत आहे.

त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या रस्त्यांबाबत प्रशासकीय स्तरावर ई-निविदा प्रक्रिया पार पडली असल्याने पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावर नाविन्यपूर्ण कामास प्रत्यक्ष सुरुवात करावी अन्यथा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिला आहे.

सदर मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता दि.ना.तारडे यांना देण्यात आले या प्रसंगी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे समवेत शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, महिला अध्यक्ष रेश्माताई आठरे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेटिया, मा.नगरसेवक विजय गव्हाळे, प्रा अरविंद शिंदे,युवतीच्या अध्यक्षा अंजली आव्हाड, युवराज शिंदे, सुमित कुलकर्णी, सचिन मुदगल, भाऊ मुदगल, प्रा.सीताराम काकडे,  संभाजी पवार तसेच आदी पदाधिकारी  उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!