शिवराज्य ब्रिगेडच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शिवराज्य ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुंबई अमोल जाधव तसेच महाराष्ट्र संघटन प्रमुख दत्ता चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय बल्लाळ, चारकोप विधानसभा अध्यक्ष सुशांत विनेरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी किरण फटांगरे यांची निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी गणेश शिंदे, गणेश सातकर, संदीप साळुंखे, अमोल नायकू, मच्छिंद्र बेरड, अच्युत गाडे, प्रशांत झोडगे, योगेश साळुंके, नवनाथ कापसे, सागर झोडगे, रावसाहेब जावळे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा अध्यक्ष किरण फटांगरे म्हणाले की संघटनेची ग्रामीण भागामध्ये ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असून वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवराज्य ब्रिगेड संघटना नेहमी प्रयत्नशील आहे अनेक सामाजिक विषय हाताळत असताना शिवराज्य ब्रिगेड संघटना वंचितांना आधार बनून कार्य करीत आहे.

पुढील वाटचाल जोमाने करणार व युवकांच्या माध्यमातून शिवराज्य ब्रिगेड संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार यावेळी फटांगरे यांनी व्यक्त करून निवडीबद्दल त्यांनी आभार मानले या निवडीबद्दल फटांगरे यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!