शेवगाव आगारात एस टी कर्मचाऱ्याने घेतली फाशी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवगाव प्रतिनिधी – एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू झाल्या नंतर राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे झाले.

मात्र आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते.त्यांचे वय ५६ असून त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती मिळाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे समजते.या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील विविध एसटी महामंडळाच्या संघटनेची मुख्य मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी आहे,ही मागणी सध्या मान्य करण्यात आलेली नाही.मात्र महागाई भत्यात वाढ,घरभाडे भत्ता यामध्ये शासनाने वाढ केली असून यामुळे राज्य सरकारवर ३० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

शासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या तडजोडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर कालपासून सुरू असलेलं एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!