श्री विशाल गणेश देवस्थान येथे अवयव दान संकल्प अर्ज भरुन देण्याचा शुभारंभ

- Advertisement -

अवयव दान ही चळवळ अधिक व्यापक होणे गरजेचे – अ‍ॅड.अभय आगरकर

     अहमदनगर प्रतिनिधी –  राजू खरपुडे

  अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, ज्याद्वारे आपण मृत्यूनंतरही आपले अवयव दान करुन दुसर्‍याला जीवनदान देऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक रुग्णांचे प्राणही वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हा एक आशेचा किरण आहे. आपले शरीर हे नश्वर आहे, परंतु अवयव दानातून त्या व्यक्तीची स्मृती जीवंत ठेवू शकतो. अवयवदान ही चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. जालिंदर बोरुडे फिनिक्स फौंडेशनच्यावतीने अवयवदानाबाबत करत असलेली जागृती कौतुकास्पद आहे. या चळवळीत आपण सहभागी होऊन दुसर्‍यांचे प्राण वाचविण्यासाठी अवयव दानाचे संकल्प अर्ज भरुन दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

     श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान व फिनिक्स फौंडेशन यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त अवयव दान संकल्प अर्ज भरुन देण्याचा शुभारंभ अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतिष आहिरे, तुषार पोटे, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, मंदार लोखंडे, श्रीकांत आंबेकर, गणेश राऊत आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, आज अनेक कारणाने मनुष्याचे अवयव निकामी होत आहेत, अशा परिस्थितीत मृत व्यक्तीने अवदान केल्यास अवयव गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा जीवनदान मिळू शकते. यासाठी आपण आज संकल्प  अर्ज भरुन दिल्यास आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. याद्वारे अनेक रुग्णांच्या जीवनात एक नवा आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. ही चळवळ व्यापक करण्यासाठी फिनिक्स फौंडेशन कार्यरत आहेत.

     याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतिष आहिरे यांनी अवयव दाना विषयी माहिती दिली. यावेळी मंदिर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अर्ज भरुन दिले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles