संगमनेर शहर पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करा – महाराष्ट्र गोवा राज्य क्षेञीय मंञी शंकर गायकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर शहरात मोठया प्रमाणावर गोवंश हत्या होत असून त्यातून होणाऱ्या आर्थिक तडजोडीबद्दल संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबई यांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा राज्य क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी संगमनेर विश्राम गृह येथे ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

गोवंशाच्या बेकायदा कत्तलीसाठी संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेरातील कत्तलखान्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन व बजरंग दल यांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती.

या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे,मात्र २ जणांना अटक झाल्याने उर्वरित ५ अटक होणे गरजेचे आहे.

“वारंवार त्याच आरोपींवर गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार नाहीतर गजाआड करण्याची गरज आहे.”

कत्तलखान्यांवर कारवाई झाल्यानंतर जप्त केलेले मांस हे गोमांसच असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची डी.एन.ए चाचणी करावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेले मांसाचे नमुने घेण्याची जबाबदारी अधिकार्‍यांची असते.

मात्र अनेक प्रकरणांमध्ये असे नमूनेच घेतले गेले नाहीत, काही प्रकरणात नमूने बदलण्यात आले असून यातही आर्थिक हित असल्याने अशा प्रकरणांची चौकशी करुन दोषी असलेल्या अधिकार्‍यांचीही चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.या मागण्या पोलीस विभागाशी संबंधीत असल्याने व येथील दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांची चौकशी झाली पाहिजे.

गोवंश हत्या बंदी झाल्यापासून आज पर्यंत ३५० गुन्हे संगमनेर येथे दाखल आहेत.”गोवंश हत्या बंदी कायद्यात कोणतीही पळवाट नसतांना, एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.”त्यामुळे तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या जातात का याचीही चौकशी केली पाहिजे.

७ दिवसांत अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे करण्याचे आवाहन शंकर गायकर यांनी केले.

व्यासपीठावर वि.हिं.प. बजरंग दल महाराष्ट्र- गोवा राज्य क्षेत्रीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी व वि.हिं.प. नगर जिल्हा संघटन मंत्री प्रशांत बेल्हेकर उपस्थित होते,यावेळी राजेंद्र देशमुख यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!