सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय व बार्टी, पुणे याच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अहमदनगर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्याख्यान, वृक्षारोपण कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षीय भाषणात राधाकिसन देवढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी कल्याणकारी राज्य चालविले. राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख पुसून त्यांच्याशी जवळीक साधली. तसेच सर्व समाजाचा बिकट बनलेला पर्यावरणाचा प्रश्न वृक्षारोपणाने सुटणार असून, या उपक्रमाद्वारे शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरल्याचे त्यांनी सांगितले.
तज्ञ व्याख्याते तथा लेखक आनंद शितोळे यांनी शाहू महाराज यांचे जीवन कार्य विस्तीर्ण स्वरुपात समजावून सांगितले तसेच व्यसन मुक्ती या विषयावर देखील युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन निमित प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. तसेच सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कोकाटे, लेखाधिकारी राहुल गांगुर्डे, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापिका प्रणिता सरपटे, वसंतराव नाईक महामंडळाचे सर व्यवस्थापक सांगळे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद आदीसह सर्व कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी समतादूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नंदिनी चितळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले. आभार एजाज पिरजादे यांनी मानले.