सारसनगर राजमाता कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शहरातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचा मानस – आ.संग्राम जगताप

 

अहमदनगर प्रतिनिधी – शहर विकासाचे नियोजन सुरू असून पुढील पन्नास वर्षाचा विचार करून कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लावत आहे व प्रलंबित अनेक प्रश्न एक-एक हाती घेऊन सोडवत आहे. फेस टू पाणी योजना व अमृत पाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

नगर शहरामध्ये काही भागांमध्ये टँकर सुरू आहे प्रत्येक कुटुंबीयांना नाळाद्वारे पाणी देण्याचा मानस असून लवकरच नगर शहर टँकर मुक्त करायचे आहे.सारसनगर आता टँकर मुक्त झाले आहे.तसेच स्वच्छतेचाही प्रश्नही मार्गी लागून शहर कचराकुंडी मुक्त झाली आहे.

शहरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ असावे या दृष्टिकोनातून नाट्य संकुलाचे काम देखील सुरु आहे. तसेच मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु असलेली मोफत आरोग्य सेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी अत्याधुनिक रुग्णालय व्हावे यासाठी निधी प्राप्त झालेला आहे.तसेच शहरातील पथदिव्यांचा देखील प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

सारसनगर राजमाता कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा,गौरव शिंदे, सतीश वारुळे,दादाभाऊ बोरुडे,ज्ञानेश्वर फुंदे,डॉ.चहाळ,रुपेश पवार, भूषण शिंदे,दिनेश उरमुडे,विद्या तन्वर,आशा वांडेकर,स्मिता वरुळे,मनीषा शिंदे, नंदा गर्जे आधी नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना आमदार संग्राम जगताप यांनी चालना दिली आहे.आपल्याला मूलभूत प्रश्नापासून कामे करावी लागत आहे, कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.याच दृष्टिकोनातून विकासाची पावले उचलली आहे सारसनगरचा विकास कामातून कायापालट केला आहे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की,सारसनगर भागाला आमदार अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सारसनगर भागाची विकास कामातून ओळख निर्माण करून दिली आहे.या भागांमध्ये काटेरी जंगल होते आता विकसित परिसर म्हणून सारसनगरची ओळख निर्माण झाली.

पूर्वी सारसनगरला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा होत होता परंतु आता प्रत्येकाला नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.भिंगार नाल्यावर दोन ठिकाणी पुलाचे कामे मार्गी लावले आहेत आता रस्त्यांची कामे देखील सुरू होणार आहे त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ही मार्गी लागेल असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!