सुनिता कोतकर यांच्या प्रयत्नातून केडगांव, मराठानगर येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सुनिता कोतकर यांच्या प्रयत्नातून केडगांव, मराठानगर येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

नागरिकांच्या सहकार्याने प्रभागातील कामांना चालना मिळाली – सुनिता कोतकर

नगर – गेल्या काही वर्षांपासून केडगांव परिसात चांगली विकास कामे उभी राहिली आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम करुन अनेक कामे मंजूर करुन ती पूर्ण केली आहे. प्रत्येक भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यासाठी यासाठी आपण कायम प्रयत्नशिल राहिलो आहोत. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी मंजूर कामे मार्गी लावत आहोत. ती कामे आता पुर्ण करण्यात येत आहेत. नागरिकांच्या सहकार्याने आपल्या प्रभागातील कामांना चालना मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या भागातील ड्रेनेज लाईनचा महत्वाचा प्रयत्न आज मार्गी लागत असल्याचे समाधान आहे. यापुढील काळातही अशाप्रकारे कार्यरत राहू, असे प्रतिपादन नगरसेविका सुनिता कोतकर यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सुनिता कोतकर यांच्या प्रयत्नातून केडगांव येथील मराठानगर (लालानगर) येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी केडगांव शिवसेना विभागप्रमुख संग्राम कोतकर, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, बाबासाहेब किर्तने, चंद्रकांत खंगले, गणेश खेडकर, पिराजी वाघमारे, अंबादास गायकवाड, मंगेश खंगले, सरदार पठाण, बच्चू जाधव, जाकिर राजे, समीर सय्यद, शेख बशिर, शेख इस्माईल, बाबासाहेब दळवी, बाबासाहेब भोलार, नितीन अजबे, ज्योती कदम, मिनाक्षी फडतरे, गायत्री कुलकर्णी, आशा दळवी, करुणा वाघमारे, आशा चितळे, सुवर्णा डोरले, रोहिणी डोंगरे, कल्पना जाधव, रजिया शेख, सोनाली डोंगरे, आशाबाई दराडे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन कोतकर म्हणाले, केडगांवचा सर्वांगिण विकास व्हावा, प्रत्येक नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत, त्यांनी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. नगरसेवकांच्या मदतीने आपल्या भागात चांगली विकास कामे होऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. नागरिकही शिवसेनेच्या मागे उभे राहत असल्याने पुढील काळातही विकास कामासाठी कार्यरत राहू, असे सांगितले.

याप्रसंगी संग्राम कोतकर म्हणाले, जनसंपर्कातून नागरिकांच्या समस्या समजतात त्यातून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिल्यास कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागत असतात. आपला प्रभाग आदर्श व्हावा, यासाठी विकास कामासाठी सदैव प्रयत्नशील राहिलो. प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!