स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय येथे वृक्षारोपण

- Advertisement -

वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज : अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर

अहमदनगर / प्रतिनिधी
प्रत्येकाने वृक्षारोपण करून वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, टिळक रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी अति.मुख्य कार्यकारी भोर बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, मुख्याध्यापक विजय आरोटे, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ मिसाळ, लेखापाल सुधीर वाघ, अधीक्षक संजय राठोड, हेमंत ढाकेफळकर, विशाल जगताप, संकेत शेलार, शिक्षिका पूनम आढाव, शैलजा पांडकर, अश्विनी चौधरी, आदी उपस्थित होते. भोर म्हणाले, वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, झाडे लावणे ही जबाबदारी आमची नाही असे म्हणून चालणार नाही, तर समाजातील रुढी परंपरेनुसार आपण जसे मुल दत्तक घेतो व त्याची जोपासना करुन मोठे करतो त्याप्रमाणे झाडे लावून त्याची जोपासना नियमित करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!